top of page

कीटकांच्या दुनियेत

Dr. Prakash Joglekar

अन्न-साखळी मध्ये कीटकांचे स्थान आगळेवेगळे आहे त्यांची दुनिया ही अशीच निराळी. या दुनियेची छोटीशी सफर.


पृथ्वीवर वैविध्यपूर्ण जीवसृष्टीची निर्मिती झाली तेव्हा प्रत्येक सजीवच नाही, तर निर्जीव घटकालाही काही महत्त्व होतं. एकमेकांशी संबंध होता व यातील एका जरी घटकाचा समूळ नाश झाला, तरी इतर घटकांचे अस्तित्व धोक्यात येणार हे नक्की!

विशेषतः कीटक म्हटले की, आपले तोंड वाकडे होते व प्रथम या सृष्टीचा बंदोबस्त कसा करता येईल हाच विचार मनात येतो; पण सर्व कीटकांचे सृष्टीवर किती उपकार आहेत आणि मानवाने आपल्या फायद्यासाठी किती व कसा उपयोग करून घेतला आहे याची आपण कल्पनाही करू शकत नाही. कीटकांचा अभ्यास त्यावर आवर घालण्यासाठी होतो हे खरे; पण जनुकांवर वातावरणातील बदलांमुळे किती घातक परिणाम होतो याचे सुद्धा अंदाज येतात. कारण अनेक पिढ्यांचा अभ्यास आपण थोड्या काळात करू शकतो साधारणपणे तेच माणसाच्या बाबतीत घडणार. फुलपाखरांच्या अळ्यांवरून काही अंदाज बांधले आहेत; पण फुलपाखरू त्या परिसराची माहिती देणार उपग्रह आहे. विशिष्ट प्रकारच्या फुलपाखराच्या आयात ठराविक वनस्पती वरत वाढणार. हे फुलपाखरू एखादा भागात दिसले तेव्हा संबंधित वनस्पती आसपास आहे हे लक्षात येते. ती ज्या प्रकारच्या वातावरणात वाढते याचा अंदाज येतो अशा वातावरणात पाकी श्रुष्टी कशी असेल हेही समजते आपण जे फळे धान्य खातो ते मधमाशांनी केलेला परागीभवन यामुळे आपल्याला मिळतात इतर कीटकांचा सहभाग वेगळा सर्व प्रजातीच्या डास घातक नाहीत वटवाघुळ जलचर अवस्थेत असताना त्यांच्या चतुर चार ते पाच वर्षात पाण्यात असतात आपण कीटकनाशक वापरतो तेव्हा इतरही अनेक कीटक मारतो त्यांचे अंश धान्यातून भूगर्भात पाण्यातून आपल्या पोटात जातात लंडन येथील क्यू बोटॅनिकल गार्डनमध्ये एका प्रकारची गांधील माशी वाढले आहे ती घातक किटकांचा समाचार घेते लेडी बग हा कीटक इतर कीटकांवर जगतो साध डीडीटी चे उदाहरण घेऊ. प्रथम वापरल्यानंतर धान्य उत्पादन वाढले ती डीडीटी गांडूळे पचवतात पण त्या गांडूळ वर जगणारे पक्षी मात्र मरतात आपण समुहाने राहण्यास सुरुवात केल्यापासून डेंग्यू मलेरिया सारख्या रोगांचे रूपांतर साथीच्या रोगांमध्ये झाले.

थायलंडमधील एका मजेदार आकडेवारीनुसार दहा किलो गोमांस, तीन किलो पोर्क व पाच किलो चिकन बनते आणि नऊ किलो खाण्यायोग्य किडे मिळतात.

अन्नधान्य, प्रथिनांची कमतरता आताच जाणवत आहे. उपाय म्हणून कीटकांची शेती करणे सुरू झाले आहे. फार पूर्वीपासून कीटक खाण्यात येत आहेत. वाळवी हे आदिवासी व माकडाचे आवडते खाद्य. घरटी करून राहणाऱ्या तांबड्या मुंगळ्यांची चटणी माडिया जमातीची आवडते खाद्य. चवीला आंबट तिखट. नाकतोडे सर्रास खाल्ले जातात. मूळचे अमेरिकन पाईक या जंगलात प* जातीच्या पतंगाच्या अळ्या खाण्यासाठी वाढतात. आफ्रिका देशांमध्ये ही अशा लार्व्हा खातात. *** अळ्या खाल्ल्या जातात. मेक्सिको मध्ये काही वर्षांपूर्वी टोळधाळ आली होती. नागरिकांना टोळधाळ पकडण्यास जाळी देऊन प्रशिक्षित केले, त्या पासून प्रथिनयुक्त खाण्यायोग्य पावडर तयार केली. कीटकनाशके, त्यांच्या फवारणीचा खर्च वाचलाच; पण प्रत्येक कुटुंबाला थोड्या कालावधीत सरासरी ३५०० डॉलर्स मिळाले.

उद्योगधंद्यात कीटकांचे अनेक उपयोग केले गेले आहेत. लाकडावर कोरीव काम करणारी हत्यारे कीटकांच्या जबड्यांचा अभ्यास करून तयार केली गेली. मधमाशा मधा बरोबर मेण देतात. लाख किड्यांपासून मिळते. खवल्या असलेल्या विशिष्ठ किड्यांपासून कार्मिन डाय मिळतो तो आजही लिपस्टिक, नेलपेंट मधे वापरतात.

वैद्य शास्त्रावर तर कीटकांचे उपकारच आहेत. चरकाने जखमा शिवण्यासाठी मुंगळे वापरले. जखमेची दोन टोके एकत्र करून मुंगळ्याना विशिष्ट प्रकारे चावा घ्यायला लावायचा, मुंग्यांचे डोके तोडायचे. जळवा तर सर्व जगभर वापरल्या जातात, मशीची आळी अवस्था, मगर, जखम साफ करण्यासाठी उपयोगी विशेषतः डायबेटिसबाधित पाय, त्या फक्त मृत अव्यय खातात. हाडांच्या पोकळीत जेथे हत्यारे शिरू शकत नाही तिथे ही पोहचतात. ऑस्टिओ मायलाआयटीसमध्ये जेथे प्रतिजैविके पोचत नाही तिथे मॅगट पोचतात. मधमाश्यांच्या डंख संधिवातावर वापरतात. सिल्क जखमा शिवण्यासाठी वापरल्या जातात. तांबड्या मुंगल्यांमधून प्रथम फॉरमॅलिन हे जंतुनाशक मिळाले.एकाच प्रजातीच्या रेशमाच्या आळीपासून रक्तातील मेद कमी करण्याचे औषध बनवतात. पुरुषांच्या लैंगिक ताकद वाढविणारी औषधे कीटकांच्या विषापासून बनवतात. अलीकडे आस्थिभंग बांधण्यासाठी लागणारे स्क्रू कोळ्याच्या जाळ्या पासून बनविण्यास सुरुवात झाली आहे. ते क्ष किरणे आडवत नाहीत व त्यामुळे हाडे भरून येण्याची प्रक्रिया चांगल्या प्रकारे अभ्यास्ता येते. अमेरिकेत उटाह विद्यापीठात सद्ध्या यावर प्रयोग चालू आहेत.

पडलेल्या पालापाचोळ्याचे, जंगलातील मृतदेहाचे विघटन कीटक करतात - बिनपगारी ,संपावर न जाणारे कामगार! मुंग्या, वाळवी, वारूळ करतात तेव्हा जमिनीचे थर हलवतात. मुंग्या निवडुंगाच्या फुलातील मध खाण्यास जातात तेव्हा परागीभवन करतात. निवडणुकांच्या बिया आपली अंडी समजून फसतात. वारुळात नेऊन निवडुंग वाढविण्यास मदत करतात.निवडुंग हे काही जनावरांचे आणि माणसांचे खाद्य आहे.त्यांपासून औषधे बनवतात हे विसरून चालणार नाही .

युद्धांमध्ये सुद्धा हत्यारे म्हणून कीटक वापरले गेले आहेत आजच्या अणुयुगातही ! २६०० वर्षांपूर्वी गांधील माशीची पोळी मडक्यात वाढविण्याची कला अवगत होती व ही मडकी बॉम्ब सारखे वापरत .गुहेत लपलेले शत्रू सैन्य हुसकाविण्यास मधमाशा गांधीलमाशा वापरल्या जात .काही वेळा लढाई सोडून पळून जाण्याची वेळ शत्रू सैन्यावर आली होती .जेजुरी गडावर औरंगजेबाला केलेली चढाई मधमाश्यांच्या हल्ल्यामुळे सोडून द्यावी लागली होती , असे सांगितले जाते .बाणांच्या टोकाला कीटकांपासून बनवलेले विष लावले जात असे .१८ व्या शतकात युद्धात युरोपमध्ये मधमाशा वापरल्या गेल्या होत्या . दुसर्‍या महायुद्धात जपानने प्लेगचे जीवाणू बाळगणाऱ्या पिसवांचे बॉम्ब तयार केले होते (सन १९४०) . जमिनीवरून २०० फूट उंचीवर ही मडकी शत्रू सैन्यावर , मुलखावर फोडली होती .पुढील सहा वर्षे प्लेगच्या साथी येत होत्या , ज्यात दीड लाख नागरिकांचा मृत्यू झाला होता .दुसऱ्या महायुद्धात जर्मनीचे शास्त्रज्ञांनी एक प्रकारचा भुंगा तयार केला .त्यामुळे युद्धकाळात युरोपात बटाट्याचे पीक बाधित झाले होते . १८ व्या शतकात युरोपमध्ये माशांचा उपद्रव फार वाढला होता. ती संख्या पिसांद्वारे प्लेगचे जंतू पसरवून मर्यादित केली गेली.

कीटकांना सांस्कृतिक महत्त्व सुद्धा आहे. आजही अमेझॉन नदीच्या परिसरात विशिष्ट जमाती पूनेविवाहापूर्वी विधवा स्त्रीचे शुद्धीकरण वळवीची धुरी देऊन केले जाते. चतुराचे चिन्ह हे जपानमध्ये विजयाचे प्रतीक म्हणून वापरतात. एक प्रकारचे खवल्याचे कीटक इजिप्तमध्ये जन्माचे प्रतीक मानतात. त्यांच्या प्रतिमा कोरलेले दागिने घालतात. इजिप्तमध्येच मृतदेहाच्या हृदयाच्या जागी कीटक ठेऊन पुरत असत. ज्या योगे पुनर्जन्म होतो अशी श्रद्धा होती. जुन्या चिनी नाण्यांवर कीटकांच्या प्रतिमा होत्या व आजही नाकतोड्यांच्या शर्यती लावल्या जातात भरपूर पैसे लावून. रेड इंडियन रेशमाच्या मोकळ्या कोशात दगड घालून शिवून माळ करतात. ती घुंगुरांसारखी वापरली जाते.

आपण या कीटक जगाकडे वेगळ्या नजरेने पाहण्यास शिकले पाहिजे. मधमाश्या उगीच कुणाला चावत बसत नाहीत. त्यांना कोणापासून धोका वाटला , आपण त्रास दिला तरच चावतात. आपणच आपली शहरे वाढवतो तेव्हा वाळवीच्या घरात रहावयास जातो, हे विसरून चालणार नाही. कीटक हा सर्व सजीवांच्या अन्नसाखळीतील उपयुक्त घटक आहे. सजीवांच्या प्रजोत्पादनातही मदत करतो. कीटकांची संख्या मर्यादित करण्यास इतरही उपाय शोधले पाहिजे. निदान ज्या जागा वापरात नाहीत, बागेतील कोळ्यांची जाळी काढू नयेत. पाली घरात का येतात, खाद्य असते म्हणून , त्यांचा तसा उपद्रव नसतो. सर्व भक्षक यांप्रमाणे त्यासुद्धा ' टेरिटोरियल' आहेत. त्यांची संख्या कायम राहते. केरळ मधील एका बागेत माव्याचा उपद्रव झाला होता. उपाय सापडत नव्हता. एकदा भात शिजवताना चूक झाली.पाणी जास्त झाले,ते भात शिजवल्याचे पाणी ज्या स्त्रीने खिडकीबाहेर फेकले नेमके मावा बाधित झाडांवर पडले ते वाळले. माव्याचा हवेशी असलेला संपर्क तुटला. आपोआप उपाय सापडला.अशी निरीक्षण एकत्र करून लोकांपर्यंत पोचवली पाहिजेत.यंदा पंजाबात कापसाचे पीक पांढऱ्या माशीमुळे धोक्यात आले आहे, कारण उशिरा लागवड झाली व या माशीच्या सीझनमध्ये झाडे टणक झाली नव्हती. प्रयोगांनी लक्षात आले की, अतिशय अल्प प्रमाणात साबण घालून केलेल्या पाण्याचा फवारा त्याच्यावरचा उतारा आहे.

माझे एक पेशंट शेतकरी कुटुंब आहे.तीस वर्षांपूर्वी मी त्यांच्याकडून योग्य टोपली मागून घेतली. पुढील वेळी जाताना चार गावठी कोंबड्या व एक कोंबडा नेला. गोचिडांवर कोंबड्या पोसल्या, पौष्टिक अंडी मिळू लागली.शेतातील किडे खाताना नकळत खुरपणी होऊ लागली. (हा प्रकार मी ' वन स्ट्रा रिव्होल्यूशन' पुस्तकात वाचला होता.)

कीटक पुराण न संपणारे आहे; पण अभ्यासणे महत्त्वाचे आहे. खरे तर अशा गोष्टी शाळेतील मुलांच्या मनावर बिंबवाव्यात. आज पर्यावरण हा विषय सक्तीचा आहे ही समाधानकारक गोष्ट आहे.


1 view0 comments

Recent Posts

See All

Comments


Post: Blog2 Post
bottom of page